
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषीत केला असुन कोरोना विषाणूचा प्रसार भारतात, संपुर्ण महाराष्ट्रात गतीने पसरत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात या कोरोना (Covid-19) विषाणु चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (३) अन्वये जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी जमावबंदी आदेश निर्गमित केले असताना सुध्दा बरेच नागरीक सदर जमावबंदी आदेशाचे उल्लघन करुन रस्त्यावर विनाकारण फिरत असल्याचे आढळुन आल्याने दिनांक १९ मार्च, २०२० ते २४ मार्च, २०२० पावेतो जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणान्यांविरूध्द भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ अन्वये ३९ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
तरी. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी चंद्रपूर जिल्हयातील सर्व नागरीकांना याद्वारे पुनश्च: आवाहन केले आहे की, चंद्रपूर जिल्हयात कोरोना (Covid-19) विषाणु चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाद्वारे निर्गमित केलेल्या संचारबंदी आदेशाचे पालन नागरीकांनी काटेकोरपणे करुन स्वतःची आणि इतरांचे जिव धोक्यात टाकु नये. तसेच पोलीसांना सहकार्य करावे.
संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतांविरुध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी,
More Stories
भद्रावतीकरांच्या स्वागताने भारावून गेलो, संवाद साधण्याकरीता पुन्हा नक्की येईन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे भावोद् गार
गृहमंत्री अनिल देशमुख यांचेतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
भद्रावती शहरातील एक दारु चकना फ्री अवैध दारू विक्रेत्यांन मध्ये स्पर्धा सुरू आहे.